राजकारण

ठाण्याचे पालकमंत्री बेपत्ता; भाजपने व्यक्त केली नाराजी

अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, सध्या ठाण्याचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे करताना दिसून येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास मिरगणे| ठाणे : राज्यामध्ये शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा शंभुराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. परंतु, शंभुराज देसाई हे कधीतरी ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

शंभुराज देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासोबत सातारा जिल्ह्याचीही पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. परंतु, शंभूराज देसाई ठाण्याचे पालकमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये येताना दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, सध्या ठाण्याचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे करताना दिसून येत आहे.

यामुळे ठाणे जिल्ह्यातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असताना त्यांना पालकमंत्री देण्यात आलं नाही याबाबत भाजपने सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या काही नेत्यांनी हे पालकमंत्री येत नाहीत, अशी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची यांच्याकडे देण्यात यावा, असा आग्रह भाजपचा असल्याचे समजते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttam Jankar : "ससा धरुन खाणारी माणस" उत्तम जानकर यांच्या वक्तव्यावरून खळबळ; प्राणीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट! 100 मोबाईलसह सोन्याच्या चेनवर हात साफ; पोलिसांची कारवाई सुरू

Manoj Jarange Patil At Narayangadh :"...तर आम्ही मुंबईचं भाजीपाला दूध बंद करू" जरांगेंची मोठी घोषणा! दसरा मेळाव्याच्या तयारीला लागण्याचे मराठा समाजाला आवाहन

Mumbai Lalbaugcha Raja Visarjan 2025 : कोळाबांधवांची अवहेलना, भक्तांसोबत अरेरावी अन्... कार्यकर्त्यांचा माज अखेर उतरला; थेट CMला पाठवलं पत्र