राजकारण

...मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात; गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी

Gulabrao patil यांनी उध्दव ठाकरेंवर केली जाहीर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तरीही शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करणार नाही, असे शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात येत होते. परंतु, याला फाटा देत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उध्दव ठाकरेंवर जाहीर टीका केली आहे.

गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच उध्दव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शेवटी नेत्याने पण कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे. पण, आमचं उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतलं नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

ज्यावेळी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, तेव्हा त्यांच्याशी सहज बोलता येत होतं. परंतु, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही कुणाकडे बोलायचं? माझा व्यक्तिगत प्रश्न नव्हता, पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती. त्यामुळे आम्ही वारंवार हे प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, असेही पाटलांनी सांगितले.

आम्ही हेच सांगायला गेलो होतो की, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना परत बोलवा. परंतु, संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा. मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात. आणि उठाव केला, अशी मनातील खदखद गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या राज्यभरात शिवसंवाद यात्रा सुरु आहे. यादरम्यान त्यांनी चूक मानय करा. मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास खुले आहेत, असे आवाहन बंडखोर आमदारांना केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा