Nirmala Sitharaman Team Lokshahi
राजकारण

अर्थसंकल्पात मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेसाठी केली 'ही' मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये गरिबांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस केला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये गरिबांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस केला. केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेसाठी तिजोरी खुली केली. गरिबांनाही स्वतःचे घर असावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. पंतप्रधान आवास योजनेचे बजेट ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रुपये केले आहे.

मोदी सरकारने गरिबांसाठी अंत्योदय योजनेबाबतही मोठी घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. अर्थमंत्री म्हणाले, 'आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे.

अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले, 'पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपये केले जाईल. त्याच वेळी, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. याशिवाय शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शेतीशी संबंधित स्टार्ट अप्सना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंडाची स्थापना केली जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान