राजकारण

इंडिया आघाडीचा मुंबईत मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यासाठी आज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे. परंतु, पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून ताब्यात घेतले आहे. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्वेषाच्या घटनाचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. 'मीपण गांधी' हा नारा देत ही यात्रा काढण्यात आली असून या यात्रेत इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच पक्ष सहभागी झाले आहेत. परंतु, आंदोलनात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. अशातच, अबू आझमी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा