राजकारण

इंडिया आघाडीचा मुंबईत मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यासाठी आज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे. परंतु, पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून ताब्यात घेतले आहे. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्वेषाच्या घटनाचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. 'मीपण गांधी' हा नारा देत ही यात्रा काढण्यात आली असून या यात्रेत इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच पक्ष सहभागी झाले आहेत. परंतु, आंदोलनात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. अशातच, अबू आझमी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा