Congress MLA Dhiraj Deshmukh 
राजकारण

आमदार धीरज देशमुखांचा बेळगावात जय बेळगाव, जय कर्नाटकचा नारा

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी बेळगावात जाऊन जय बेळगाव, जय कर्नाटकचा नारा दिला. त्यामुळे सीमावासियांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

बेळगाव : मराठी भाषिक (Maharashtra-Karnataka Dispute) महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत असतानाच, त्यांना महाराष्ट्रातून हवा तेवढा राजकीय पाठिंबा मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यातच लातूरचे आमदार धीरज देशमुख हे (Dhiraj Deshmukh) बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्याठिकाणी आपलं भाषण संपल्यानंतर धीरज देशमुखांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला. आणि या नाऱ्यावरुनच सीमाभागातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता किमान मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नये, अशा प्रतिक्रिया सीमाभागातून व्यक्त केल्या जाताहेत.

बेळगाव जिल्ह्यामधील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख आणि कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांना बोलावलं होतं.

या कार्यक्रमावेळी नेतेमंडळींनी भाषणंही केली. त्यात आमदार धीरज देशमुखांनी 'जय हिंद जय महाराष्ट्र' म्हणून त्यांचं भाषण संपवलं. पण आपण बेळगावात असल्याचं समजताच धीरज देशमुख परत माईकजवळ आले आणि त्यांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला.

आमदार धीरज देशमुखांच्या या नाऱ्यामुळं बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक नाराज झाल्याचं बोललं जातंय. धीरज देशमुखांनी जय कर्नाटकचा नारा देऊन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जातेय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा