राजकारण

शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात; अजित पवार गटाच्या आरोपांना जयंत पाटलांचे जशात तसे उत्तर, म्हणाले...

अजित पवार गटाचे निवडणूक आयोगात शरद पवारांवर आरोप; जयंत पाटलांनी दिले प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. यादरम्यान अजित पवार गटाने शरद पवारांवर मोठे आरोप केले आहेत. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, अशी टीका अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या पक्षातून जे गेले त्यांचा उल्लेख करायची गरज नाही. आपण आपली क्षमता वाढवली पाहिजे. सगळ्यांच्या मनात शंका आहेत कि हे सर्व जण आतून एकच आहेत. परंतु, असं काही नाही. शरद पवार निवडणूक आयोगात दिवसभर बसले होते यातच सगळं आलं. आता परतीचे दोर तुटले आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली की पवार साहेब हुकूमशाहा आहेत. उलट सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे म्हणजे पवार साहेब आहेत. मात्र, तुमच्या कार्यपद्धती वर बोललो तर अवघड होऊन जाईल, असा खोचक टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते. पदाधिकाऱ्यांच्या फक्त नियुक्त्या व्हायच्या, निवडणूक व्हायच्या नाहीत. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात? जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात, असा थेट आक्षेप अजित पवार गटाने शरद पवारांवर घेतला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक