राजकारण

उर्वशी रौतेलाचे नाव घेत राष्ट्रवादी नेत्याची राज्यपालांवर टीका; काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशातच, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोश्यारींवर टीका करताना जीभ घसरली आहे. राज्यपाल वासनांध होते. हा महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस राज्यपालांना कधीही माफ करणार नाही. राज्यपाल हे एखाद्या राजकीय पक्षाचे हस्तक असल्यासारखे वागले आणि पाहिल्या दिवसापासून घटनेची पायमल्ली करत राहिले. उर्वशी रौतेला हिला विमानातून घेऊन जाणे वगैरे प्रकारांमुळे ते वासनांध होते, हेही स्पष्ट होतं. मात्र, त्यांनी पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपती यांच्याकडे इच्छा व्यक्त करण्यास हवी होती, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा इन्स्टाग्राम पोस्टवरील एक व्हिडिओ मध्यतंरी चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत दिसत आहे. उर्वशीने इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले की ती आणि राज्यपाल गोव्याच्या दौऱ्यावर जात आहे. यावरुन राज्यपालांना ट्रोल करण्यात आले होते. उर्वशीला राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक