राजकारण

Vishwajeet Kadam : संजय राऊतांच्या अंगात आलं अन्...

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उलघडले गुपित

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सांगली : शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) कलह, पहाटेचा शपथविधी आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेना या तीन पक्षांचे एकत्र सरकारचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात करण्यात आला. समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी सरकारला आज अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार सत्तेत कसे आले, असा प्रश्न अनेकांच्या मनात आजही अनुत्तरीतच आहे. याचे उत्तर आता राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी दिले आहे.

महाविकास आघाडी कशी सत्तेवर आली हे सांगताना, निवडून आलो तरी विरोधी बाकावर बसावं लागणार होतं. पण, शिवसेना खा.संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. आणि उपस्थितितांच्या चेहऱ्यावर हास्यलकिरी उमटल्या. राज्यमंत्र्यांच्या या मिश्किल बोललण्याने आमणापूर ग्रामस्थांना पुन्हा स्व.डॉ. पतंगराव कदम यांची आठवण आली.

विश्वजीत कदम यांनी आमणापूर गावातील विविध विकासकामांसाठी उपस्थित होते. यावेळी आमणापूर ग्रामस्थांना संबोधित करताना राज्यमंत्री चांगलेच मुडमध्ये बॅटींग करताना पाहायला मिळाले. कार्यक्रमाला उशिर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच अजून पोळ्या खायच्या राहिल्याचे सांगितले. एवढा उशीर होईल माहिती असते तर दिवस ही वेगळा निवडला असता आणि दहा बारा बोकड, असे विश्वजीत कदम यांनी म्हणताच उपस्थितांनी मनापासून हसून दाद दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर