राजकारण

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; पहिला टोलनाका पेटवला

मुलुंड टोलनाक्यावर आधी मनसे नेते अविनाश जाधव यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. मात्र, आता मनसेच्या टोल नाकाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनसेच्या टोल नाकाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मुलुंड टोलनाक्यावर आधी मनसे नेते अविनाश जाधव यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. मात्र, त्यांना ताब्यात घेतल्यावर काही मनसैनिकांनी टोलनाका पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ही केबिन आणि त्यातील साहित्य जाळून खाक झाले आहे.

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे. प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक होत पनवेल, मुलुंडच्या टोलनाक्यावर हजर झाले होते. टोल न भरताच चारचाकी वाहनं मनसेकडून सोडण्यात येत होती. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन सुरु होते. यादरम्यान आता अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

यानंतर मात्र मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून मुलुंड टोलनाका पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टोल नाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल आणि टायर पेटून टाकण्यात आले आहे. यामुळे ही केबिन आणि त्यातील साहित्य जाळून खाक झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा