राजकारण

महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर; नाना पटोले म्हणाले...

महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं.

Published by : Siddhi Naringrekar

हिवाळी अधिवेनशन पार पडलं त्यानंतर राज्य खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं. अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये गृहमंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रायलयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृह निर्माणखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोले म्हणाले की, महायुतीची परिस्थिती आता कौरवांसारखी आहे. हे आपसातच लढू आता यांचा कार्यक्रम संपणार आहे. कारण मलईदार जिल्हे, मलईदार खाते याचीही लढाई लांब चालली. यांची आता पालकमंत्रिपदासाठी भांडणं होणार.

विधासभेच्या अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओसुद्धा मंत्र्यांना देऊ शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नाचं घेणंदेणं नाही. असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. असे नाना पटोले म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली