Narayan Rane 
राजकारण

Narayan Rane : 'सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे...'; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Narayan Rane ) राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. ही विजयी सभा 5 तारखेला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते ? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले ?मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ?'

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्केपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण ? मराठी बद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले ? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल.' असे नारायण राणे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Earthquake Warning : प्राणी-पक्षी भूकंप किंवा त्सुनामीपूर्वी अस्वस्थ का होतात? कारण कळताच व्हाल थक्कल

Latest Marathi News Update live : ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा पुन्हा भाजपात प्रवेश

Shailesh Jejurikar : अभिमानास्पद! शैलेश जेजुरीकर बनले P&G चे CEO; 2026 पासून स्वीकारणार जबाबदारी

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचा गैरवापर उघड; अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश