Ajit Pawar | Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाले, त्याचा बदला आपल्याला घ्यायचा; अजित पवारांचे विधान

भाजपला धक्का देण्यासाठी पुन्हा आपल्याला ताकदीने काम करून दाखवायचे आहे.

Published by : Sagar Pradhan

एकीकडे राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरू असताना, त्यातच विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली. सर्वच पक्षाकडून जोरदार रस्सीखेच त्याठिकाणी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतिने उमेदवार असलेल्या नाना काटे यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात बोलत असताना राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

चिंचवड मतदार संघात बोलत असताना अजित पवार म्हणाले की, मविआचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगले काम केले पण अचानक मध्ये चटर पटर लोक आले आणि सत्ता गेली. त्यामुळे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना सोडावं लागले त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. विधानपरिषदेत जशी एकच जागा भाजपाला मिळाली असून बाकी ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. ते पाहता भाजपला धक्का देण्यासाठी पुन्हा आपल्याला ताकदीने काम करून दाखवायचे आहे. अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे ते म्हणले की, ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाले आहे त्याचा बदला शिवसैनिकांनो आपल्याला घ्यायचा आहे. या शहरात पहिल्यांदाच मला निवडणूक दिले आहे. काही माणसं आता नाहीत काही वृद्ध झाली आहे. त्यावेळी शिवसैनिकांचे काम मी पहिली आहे. हिरीरीने काम करायचे. उमेदवार निश्चित करत असतांना मी सर्वांशी बोलत होतो. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची परवानगी घेऊन नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड