राजकारण

राज ठाकरे-फडणवीस महाराष्ट्राची फसवणूक करताहेत; कुणी केली टीका?

टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर काल राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंनी मोठे निर्णय घेतले आहेत. चार मिनीटांपेक्षा अधिक एकही गाडी टोल नाक्यावर थांबणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांचे नुकतेच झालेल 'टोल मुक्त आंदोलन' म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी "तू मारल्या सारखं कर, मी रडल्या सारखं करतो" करार, अशी टीका क्लाईड क्रास्टोंनी केली आहे. तसेच, स्क्रिप्ट लिहिल्याप्रमाणे बोलणे आणि वागणे, महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक दोघेही करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केले की चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही. लोकांना वाटलं की आम्हाला फसवलं जाताय की काय? टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्स वर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील आणि किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल, असेही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान