Rohit Pawar  Team Lokshahi
राजकारण

'अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचं ठेवणार नाही', रोहित पवार भडकले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विचारांची पातळी फारचं खालची आहे

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच वादग्रस्त विधानाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. तर त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केले. त्यावरून प्रचंड गदारोळ सुरु असताना त्यावरच आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी या विधानांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलतांना ते म्हणाले की, ' भाजपचा एक प्रवक्ता दिल्लीमध्ये बसतो. अरे दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवले होते. मात्र तिथे बसून तो म्हणतो की, महाराजांनी देखील माफी मागितली होती. अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागण्याच्या लायीकाचा देखील आम्ही सोडणार नाही. तर भाजपच्या प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या या विधानावर राज्यातील एकही भाजपा नेता बोलला का? असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मला आधी वाटत होते की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विचारांची पातळी फारचं खालची आहे. पण आता निश्चित झाले आहे, त्यांना विचाराची पातळीच नाही. सहजपणे छत्रपती यांच्यावर बोलतात. थोर व्यक्तींच्या विरोधात जर तुम्ही बोलणार असेल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता राज्यात ठेवणार नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान करण्यात आले, त्यावेळी तुमच्या आमदारांनी विरोध केला का?, भाजपच्या नेत्यांनी विरोध केला का?' असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitin Gadkari : 'सरकारविरोधात याचिका टाकणारे लोक असायलाच हवे'; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'मुळे अन्य योजनांचा निधी वितरणात विलंब; मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यानं खळबळ

Sanjay Shirsat Special Report : सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात, टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली?

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला