राजकारण

Nilesh Rane : महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवारांना नेहमीच समाधान मिळालंय

निलेश राणेंची शरद पवारांवर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बाबासाहेब पुरंदरेंच्या (Babasaheb Purandare) लिखाणामुळं शिवाजी महाराजांवर जेवढा अन्याय झाला तेवढा कशामुळंच झाला नाही, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी केले होते. यावर आज भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे म्हणाले की, पवार साहेबांना मधूनच बाबासाहेब पुरंदरे आठवतात. कारण दोन महिने झाले पवार साहेबांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद लावला नाही. महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवार साहेबांना नेहमीच समाधान मिळालेले आहे, असा थेट आरोपच त्यांनी पवारांवर केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणामुळं शिवाजी महाराजांवर जेवढा अन्याय झाला तेवढा कशामुळंच झाला नाही. पुरंदरेंच्या लिखाणामुळं अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचं काम झालं. फक्त आई जिजाऊ याच शिवरायांच्या मार्गदर्शक होत्या, असेही शरद पवार यांनी म्हंटले होते. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र ग्रंथ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?