राजकारण

Nilesh Rane : महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवारांना नेहमीच समाधान मिळालंय

निलेश राणेंची शरद पवारांवर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बाबासाहेब पुरंदरेंच्या (Babasaheb Purandare) लिखाणामुळं शिवाजी महाराजांवर जेवढा अन्याय झाला तेवढा कशामुळंच झाला नाही, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी केले होते. यावर आज भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे म्हणाले की, पवार साहेबांना मधूनच बाबासाहेब पुरंदरे आठवतात. कारण दोन महिने झाले पवार साहेबांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद लावला नाही. महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवार साहेबांना नेहमीच समाधान मिळालेले आहे, असा थेट आरोपच त्यांनी पवारांवर केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणामुळं शिवाजी महाराजांवर जेवढा अन्याय झाला तेवढा कशामुळंच झाला नाही. पुरंदरेंच्या लिखाणामुळं अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचं काम झालं. फक्त आई जिजाऊ याच शिवरायांच्या मार्गदर्शक होत्या, असेही शरद पवार यांनी म्हंटले होते. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र ग्रंथ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा