राजकारण

Nitesh Rane : रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले..., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर ट्वीटरवरुन टीका

राज्यात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे महाविकास आघाडीचे (mahavikas ) सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली. राज्याच्या सत्तेत भाजपाने पुन्हा एकदा बाजी मारली. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक हे शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे शिवसेनेची गळती रोखण्यासाठी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची सुरूवात केली आहे. 19 जुलैला शिंदे गटातून वरूण सरदेसाई यांची युवासेना अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले. तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले, असं ट्विट नितेश राणेंनी करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर बोलताना ही टीका केली. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, असंआदित्य ठाकरे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा