राजकारण

शिंदेंच्या शपथविधीवरुन राजकारण पेटलं; राज्यपालांची भूमिका का बदलली?

शिंदेंनी शपथविधीदरम्यान घेतले बाळासाहेब अन् आनंद दिघेंचे नाव; राज्यपालांची भूमिका बदलली का?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर विराजमान झाले आहेत. शिंदे यांनी शपथविधी दरम्यान सुरुवातीलाच शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन केले. व मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रश्नचिन्ह उभे करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंना स्मरून घेतली. राज्यपालांनी त्यांना अडवले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यात शपथेआधी नेत्यांची नावे घेतली होती. म्हणून मंत्र्यांना पुन्हा शापथ घ्यावी लावली होती. आता राज्यपालांची भूमिका बदलली का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, 2019 साली उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व मंत्र्यांना गोपनियतेची शपथ देत होते. यावेळी शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चिडल्याचे पाहायला मिळाले होते. शपथविधीत नेत्यांची नावे घेतल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना बोलावून दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली. ठरवून दिलेल्या मजकूराव्यतिरिक्त काहीही बोलायचं नाही, असेही कोश्यारी यांनी ठणकावून सांगितले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."