Bachhu Kadu Team Lokshahi
राजकारण

येणाऱ्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो- बच्चू कडू

त्यांचं आडनाव ५२ असल्यानं त्यांनी ५२ आमदार निवडून आणणार असं सांगितलं असेल.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय खलबतं घडताना दिसत आहे. या गोंधळादरम्यान पुढच्या निवडणुकीत ५२ आमदार निवडून आणणार, असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले होते. त्यावरच आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं आडनाव ५२ असल्यानं त्यांनी ५२ आमदार निवडून आणणार असं सांगितलं असेल. प्रहारसुद्धा विदर्भात दहा आमदार निवडून आणणार असल्याचं कडू यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

चंद्रशेखर बावनकुळे यांची जादू किती चालणार ते बघू. सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीवर बरचं काही अवलंबून आहे. शिंदे-भाजपची सरकार असल्यामुळं कदाचित ही जादू होऊ शकते. २०२४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नसतो. जर तर मध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. येणारी परिस्थिती कशी आहे, त्यावर बरेच काही अवलंबून असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. किंवा एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. प्रहार या लहान पक्षाचापण मुख्यमंत्री होऊ शकतो. आम्हीपण म्हणू शकतो. येणाऱ्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो. पण, याला काही अर्थ नाही. असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...