राजकारण

Presidential Election Results : कोण असणार नवे राष्ट्रपती यशवंत सिन्हा का द्रौपदी मुर्मू?

आज मिळणार भारताला नवे राष्ट्रपती; देशाचे लक्ष

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ११ वाजता संसद भवन परिसरात होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) आणि द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्यापैकी कोण भारताचे पुढील राष्ट्रपती होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. देशाचा 15 व्या राष्ट्रपती पदासाठी भाजपा नेतृत्वातील रालोआच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा यांच्यात 18 जुलै रोजी लढत झाली आहे. या निवडणुकीचे मतमोजणी आज करण्यात येणार आहे. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

मुर्मू यांना भाजपसह विविध पक्षांना पाठिंबा मिळाला आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, राष्ट्रपती निवडणुकीवेळी विरोधी पक्षांनी क्रॉस वोटींग केल्याच्या चर्चा आहे. यामुळे मुर्मू यांचा विजय निश्चित असून असे त्या झाल्यास आदिवासी समाजाशी संबंधीत असलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती बनतील.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी एनडीएने आतापर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी विरोधकांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा