राजकारण

आदित्य ठाकरे नासमझ आहेत; विखेंचा निशाणा

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : वेदांता प्रकल्पावरुन राजकारण ढवळून निघत आहेत. यावरुन सत्ताधारी-विरोधक समोरा समोर आले असून एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे नासमझ आहेत, राज्याबाहेर उद्योग जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ नगर इथे विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

वेदांता उद्योग गुजराथमध्ये गेल्याने टीका करणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प दुसऱ्या राज्यात का गेला याची माहिती घ्यावी तसेच वेदांता बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल माध्यमांना अवगत केले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे नवीन आणि नासमझ आहेत. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात राज्यातील नाणार सारखे उद्योग त्यांच्याच नेत्यांमुळे गेलेत हे माहिती करून घ्यावे. हा प्रकार म्हणजे उगाच चोराच्या उलट्या बोंबा मारून पोरकटपणा करण्यासारखे असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीहीआदित्यला काय कळतं. तो जी काय मागणी करत होता कंपनीकडे ती आता काहीच दिवसात बाहेर येईल. तुमचा काळ संपला. भविष्यात मंत्री मुख्यमंत्री यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ट्विट करत राहा, पण ते कोणी वाचणार नाही, असा टोला लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा