राजकारण

राहुल गांधींची पदयात्रा फक्त काँग्रेसपूरतीच; गुजरात निवडणूकीवरुन बच्चू कडूंचा टोला

गुजरात निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. भाजपाने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असून काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली दिसत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : गुजरात निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. भाजपाने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असून काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली दिसत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा फक्त काँग्रेसपुरतीच होती, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बच्च कडू म्हणाले की, गुजरात निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपला गड काबीज केला आहे. पंतप्रधान मोदींच्या विकास कामांनी हा गड पुन्हा जिंकला आहे. विरोधी पक्ष हा कमकुवत ठरला आहे. राहुल गांधीच्या पदयात्रेचा परिणाम दिसेल, असं बऱ्याच लोकांच भाकीत होतं. पण ते फक्त काँग्रेस पुरतं आहे, असं एकंदरीत चित्र आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा करिष्मा पाहायला मिळाला आहे. काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपाने दीडशे पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरुवात केली आहे. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे. तर, कॉंग्रेसला आतापर्यंत 19 जागा मिळाल्या आहेत. तसेच, आपला केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा