राजकारण

मंत्रीपदाचे आश्‍वासन दिले होते, पण अजित पवारांचाच विस्तार झाला; आठवलेंचा टोला

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. यामुळे मंत्री पदासाठी वेटिंगवर असलेल्या आमदारांचे सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

यवतमाळ : हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यामुळे मंत्री पदासाठी वेटिंगवर असलेल्या आमदारांचे सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. अशातच, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सरकारला टोला लगावला आहे. विस्तारात मंत्रीपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, अजित पवार यांचाच विस्तार झाला, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

रामदास आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. शिर्डीतून आपण स्वत: निवडणूक लढण्यास इच्छूक आहे. विधानसभा निवडणुकीत दहा जागांचा आग्रह राहणार आहे. तसेच, बाळासाहेब आंबेडकर आरपीआयसोबत आल्यास पक्षाची ताकद नक्कीच वाढेल. दोघांनी मिळून पक्ष चालविण्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रात व राज्यात भाजपच्या जागा वाढण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे. महायुती सरकारमध्ये पक्षाचे नाव घेतले जात नाही, असे म्हणत रामदास आठवलेंनी विस्तारात मंत्रीपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, अजित पवार यांचाच विस्तार झाला, असा टोला लगावला आहे.

दरम्यान, मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे. सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाही. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्‍न सुटणार नाही. जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. परंतु, जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रामदास आठवलेंनी जरांगेंना केला आहे. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, त्याशिवाय जातींची टक्केवारी कळणार नाही. टक्केवारीनुसार आरक्षण मिळू शकेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा