राजकारण

Rohit Pawar : महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, गुजरातचे स्वामित्व घेण्यास महानंदला अखेर भाग पाडलेच. महानंदकडे असलेल्या मुंबईतील जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी महानंद जाणूनबुजुन तोट्यात आणत महानंदचा गेम केला. महाराष्ट्रात काय येईल याची गॅरंटी नाही पण महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

जमिनीच्या काही तुकड्यांसाठी D_फॉर_दलाली करणे राज्यकर्त्यांना शोभत नाही. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवून घेणारे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आता भाजपच्या D_फॉर_दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का? असे रोहित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत