राजकारण

Rohit Pawar : महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, गुजरातचे स्वामित्व घेण्यास महानंदला अखेर भाग पाडलेच. महानंदकडे असलेल्या मुंबईतील जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी महानंद जाणूनबुजुन तोट्यात आणत महानंदचा गेम केला. महाराष्ट्रात काय येईल याची गॅरंटी नाही पण महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

जमिनीच्या काही तुकड्यांसाठी D_फॉर_दलाली करणे राज्यकर्त्यांना शोभत नाही. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवून घेणारे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आता भाजपच्या D_फॉर_दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का? असे रोहित पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा