Ramdas Athawale Team Lokshahi
राजकारण

राज ठाकरेंची महायुतीमध्ये आवश्यकता नाही - रामदास आठवले

मुंबई महापालिकेवर RPI, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय घडामोडी सुरु असताना, अशातच सत्तांतरानंतर भाजप, शिंदे आणि मनसेची युती होईल अशी चर्चा सुरु असताना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे सुद्धा नवनवीन कामानिमित्त भेट घेत आहेत. याभेटींमुळे देखील चर्चांना वेग येत आहे. त्यातचा नुकताच मनसे आमदार राजू पाटील यांनी चर्चेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले आहे. मात्र, केंद्रीय रामदास आठवले यांनी मनसे सोबतच्या युतीबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि मनसेच्या युतीवर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गेले असले तरी राज ठाकरे NDA मध्ये येणार नाहीत. आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही आहे. मुंबई महापालिकेवर RPI, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीमध्ये आवश्यकता नाही. असे खळबळजनक विधान रामदास आठवले यांनी यावेळी केले.

समीर वानखेडे यांनी घेतला रामदास आठवलेंची भेट

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्याभेटीवर बोलताना आठवले म्हणाले की, त्याच्यावर अन्याय झाला असल्याची भावना सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Mumbai Ganpati Visarjan : गणपती विसर्जनासाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

Pune Ganpati visarjan : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

Ganpati visarjan 2025 : Rain Update : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?