Sambhaji Chhatrapati  Team Lokshahi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावं? संभाजी छत्रपतींची वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

Published by : Sagar Pradhan

भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांबद्दल काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यासोबतच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहे. त्यावरच आता संभाजी छत्रपती यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संभाजी छत्रपती?

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विधानावर बोलताना संभाजी छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असो किंवा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे.

अशी वक्तव्य केली जात असताना मी तरी किती बोलायचं. समाज हे सर्व बघत आहे. यांनी केलेली वक्तव्य खरी असतील तर त्यांनी समोर येऊन ते खरे कसे आहेत हे सांगावं. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं. कारण त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय