राजकारण

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

खासदार संजय राऊत यांनी 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर जोरदार टीका केली.

Published by : Siddhi Naringrekar

खासदार संजय राऊत यांनी 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, संजय राऊत हे आकाशवाणी केंद्र आहेत. त्यांना रोज बातम्या द्यावा लागतात.

ते बोलताना एकतर अभ्यासपूर्ण बोलत नाहीत. फक्त ब्रेकिंग देण्याचा प्रयत्न करतात पण अभ्यास काहीच नसतो. तिसरी पार्टी दिल्लीला केजरीवाल यांची सक्सेस झाली, तिसरी पार्टी पंजाबला सक्सेस झाली, तिसरी पार्टी उत्तरप्रदेशमध्ये सक्सेस झाली. यांचं असे म्हणणं आहे की, तुम्ही एकतर आमच्या पक्षात या नाहीतर भाजपमध्ये जा.

या देशामध्ये किमान अर्धेअधिक राज्य हे तिसऱ्या पार्टीजवळ आहे. हे काँग्रेसजवळही नाही आणि भाजपाजवळही नाही आहे. म्हणून संजय राऊत यांना अभ्यास करायला सांगा, त्यांचा अभ्यास कमी पडतोय. आम्ही लढू.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, या महाराष्ट्राने दोन्ही ही सरकार पाहिलं. काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार पाहिलं आणि शिवसेना, भाजपचं पाहिलं. हे महाराष्ट्र राज्य तिसऱ्या पार्टीचं सरकार नक्की पाहिल आणि अतिशय उत्तम आम्ही चालवून दाखवू. असे बच्चू कडू म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

MP Dhananjay Mahadik : खूशखबर!, खासदार धनंजय महाडिक मोठी घोषणा; सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याचं 'हे' खास गिफ्ट

Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली? राहुल गांधींनी थेट पुरावे सादर; नाव एका व्यक्तीचं, मत दुसऱ्याचं आणि...

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली