राजकारण

तिथे चिथा जळत होत्या मुंबईत मंत्री पेढे वाटत होते; संजय राऊतांची टीका

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांचे राजकारण संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. अपघातग्रस्तांची चिता जळत असताना शपथविधी सुरु होता. तिथे चिथा जळत होत्या मुंबईत मंत्री पेढे वाटत होते. अपघातग्रस्तांचा चिता जळत असताना शपथविधी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असे राऊत म्हणाले.

यासोबत राऊत म्हणाले की, भाजपा आणि अजित पवारांमध्ये सीएम पदासाठी करार झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार. शिंदे आता काही दिवसच सीएम राहणार आहेत. शिंदेंना हटवल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री असणार. ईडीच्या भितीने शिंदे - अजित पवार सत्तेत आहेत. शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार. मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांनी ही डील केली आहे. असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा