Sanjay Raut Team Lokshahi
राजकारण

भूंखड घोटाळ्याचे कागदपत्रे योग्य ठिकाणी गेली, राऊतांचे खळबळजनक विधान

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत?

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप होत आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. परंतु, आता शिवसेन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत खळबळजनक विधान केले आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रे गेली आहेत, दरम्यान शिंदे यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस सारवासारव करत असल्याचा आरोपही त्यांनी केले आहे. नागपुरातील भूखंड घोटाळ्यावरुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशन दणाणून सोडलं. विरोधकांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरही निशाणा साधला.

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत? असा प्रश्न मी नाही तर समाजमाध्यमातून विचारला जात आहे. सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. 110 कोटींचं नुकसान झालं, 16 भूखंड बिल्डरांच्या घशात गेले तरी त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर