Sanjay Raut  Team Lokshahi
राजकारण

खत्म होते देखा है....वर्षाच्या शेवटच्या दिवशी संजय राऊतांचे खास ट्विट

राऊतांच्या या शायरीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Published by : Sagar Pradhan

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठी हानी झाली. या बंडखोरीमुळे शिवसेनेसाठी 2022 वर्ष वाईट ठरलं. या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटात सध्या प्रचंड आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. या दरम्यान राऊतांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याच वर्षी सुमारे १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राऊतांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे एक शायरी ट्विटर शेअर केली आहे.

असे आहे संजय राऊत यांचे ट्विट?

संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये मिथीलेश बारीया यांची चारोळी शेअर केली आहे. “कौन कहता हैं वक्त मरता नही… हमने सालों को खत्म होते देखा है डिसेंबर में…!” अशी शायरी संजय राऊतांनी शेअर केली आहे. राऊतांच्या या शायरीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात