राजकारण

ShahajiBapu Patil : सगळं व्यवस्थित होतं, पण राऊतांनी घोळ केला

शहाजीबापू पाटील यांनी साधला संजय राऊतांवर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अडीच वर्षांपूर्वी सगळं व्यवस्थित चाललं होते. पण, शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) घोळ केला. सगळं संजय राऊतांमुळे घडलं, असा थेट आरोप बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

शहाजीबापू पाटील म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी सगळं व्यवस्थित चाललं होते. बहुमत होते, सगळं व्यवस्थित होतं. अडीच वर्षांपूर्वी राऊत कुठे मध्येच घुसले कळलंच नाही. परत आम्हाला कुठं घेऊन गेले तेही समजले नाही. सगळं व्यवस्थित होणार होतं. पण, राऊतांनी घोळ केला. सगळं संजय राऊतांमुळे घडलं, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.

शहाजीबापू पाटील यांनी शेवटी काय डोंगर, काय हाटेल, काय शिंदे साहेबांचं नेतृत्व सगळं ओके, असा आपला फेमस डायलॉगही मारला. याला सभागृहानेही दाद दिली.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बंडखोर आमदारांनी अनेक वेळा संजय राऊतांवर शरसंधान साधले आहे. यानंतर शिंदे गटात इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरु झाली असल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. हे पाहता शिवसेनेने एक पाऊल मागे घेत खासदारांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच