राजकारण

'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ शेअर केला? संजय राऊत म्हणाले...

राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला आहे. याला आज संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारने नॅनो मोर्चा म्हंटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर मोर्चाचे व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिले होते. परंतु, राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. यावर आज संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? मी कधीच म्हटलं नाही की, तो मोर्चा महाविकास आघाडीचा होता. हे लोक त्याला नॅनो मोर्चा म्हणतायत. मी दोन्ही मोर्चांचे व्हिडिओ टाकले. दोन्ही मोर्चे राज्याच्या स्वाभिमानासाठी होते. त्यासाठी भाजपला इतकी टिका करण्याचं कारण नाही. माझं ट्विट नीट पाहा, वाचा मी काय म्हटलंय. तोही मोर्चा आमचाच होता, महाराष्ट्राचाच होता. त्यानं आणि कालच्या मोर्चानंही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवलीय, असे त्यांनी म्हंटले आहे.

भाजपने छत्रपतींच्या नादाला लागू नये. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. राज्यात महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. जशास तसं उत्तर योग्य त्या मुद्यांवर द्यायला हवं. विरोधकांना बोलू दिलं नाही तर राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही. शाहु, फुलेंचा अपमान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. बेळगाव मुद्यावर आज जशास तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्यांची तोंड बंद का झाली. आता जैसे थे परिस्थिती राहिलेली नाही. सीमाभागाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय पोलिसांना द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी

Google Gemini News Trend : गुगल जेमिनी काय ऐकत नाही! रेट्रो-थ्रीडी मॉडेल फोटोनंतर जेमिनी घेऊन आलं नवा ट्रेंड

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; बंजारा समाज आक्रमक

America Tariff News : 'टॅरिफ संकट आता...' मोठं नुकसान टळलं! भारतासाठी दिलासादायक बातमी