Uday Samant Team Lokshahi
राजकारण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. यादरम्यान, न्यायालयाने पुढील तारीख दिली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. यादरम्यान, न्यायालयाने पुढील तारीख दिली असून 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयावर भाष्य करणं चुकीचं आहे. सात न्यायमूर्ती खांपीठाकडे हे प्रकरण जावं असं ठाकरे गटाच म्हणणं आहे. त्यांच्या दाव्यंकडे मी लक्ष देत नाही. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. 20 जूनपासून त्यांना धडकी भरली आहे. तिथले अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. तसेच, आम्ही सगळे पुरावे सादर केले आहेत. सरपंच, खासदार आमच्याकडे आहेत, असेही उदय सामंत यांनी म्हंटले आहे.

तर, बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार यावर्षी होणारच नाही, असे सूचक विधान केले होते. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, जरी ते असं बोलले असतील तरी ते आमचे सहकारी आहेत. योग्य वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल. ते समंजस आहेत, लोकनेते आहेत. त्यांची समजूत काढतील. शिक्षक संघटनेच्या जागा भाजप आणि आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नवीन नवीन बातम्या रोज महाराष्ट्राला मिळत असतात. रोज सकाळचं हे झालं आहे. आम्हाला खूप काम आहेत, जनतेशी निगडीत काम आहेत. 9:30-10 चा एपिसोड मी पाहिलेला नाही, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार