राजकारण

'राऊतांचे आडनाव बदलून संजय आगलावे असे ठेवायला पाहिजे'; शिंदे गटाची राऊतांवर जोरदार टीका

श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या राऊतांच्या आरोपावर बोलताना शहाजीबापू पाटील यांची टीका.

Published by : Sagar Pradhan

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील दोन्ही गटात दिवसांदिवस वाद वाढतच चालला आहे. या वादादरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गटाला दिल्यानंतर शिंदे गटाविरुद्ध ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यावरूनच आता शिंदे गट आमदार शहाजीबापू पाटील यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाले शहाजीबापू पाटील?

श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या राऊतांच्या आरोपावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, खरं तर या संजय राऊतांचे आडनाव बदलून नामकरण करून संजय आगलावे असे ठेवायला पाहिजे. कारण ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एक निष्पाप, प्रामाणिकपणे चांगले काम करणारे तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदेंचे आहे. अशा तरुण नेतृत्वावर असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊतांनाच काय, कुणालाच शोभत नाहीत. परंतु, सध्या राऊत कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम राहिलेला नाही. अशी टीका त्यांनी यावेळी राऊतांवर केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली? राहुल गांधींनी थेट पुरावे सादर; नाव एका व्यक्तीचं, मत दुसऱ्याचं आणि...

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Laxman Hake on Manoj Jarange : "चौथी नापास दिल्लीत काय करेल?" जरांगेंच्या दिल्ली मेळाव्यावर हाकेंची चिडचिड?

Ram Kadam on Sanjay Raut : बाळासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हळूहळू भाजपमध्ये..." राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर राम कदमांची प्रतिक्रिया