Sanjay gaikwad | Girish Mahajan  Team Lokshahi
राजकारण

भाजपमुळे नाही तर 'या' कारणामुळे शिवसेनेत बंडखोरी, गायकवाडांनी खोडले महाजनांचे वक्तव्य

आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही.

Published by : Sagar Pradhan

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात अद्यापही राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच ही बंडखोरी का झाली कशी झाले? याबाबत आजही वेगवेगळे विधान येत आहे. अशातच या बंडखोरीबाबत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मोठे वक्तव्य केले होते. त्यावरच शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत हे विधान चुकीचे असलेले सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गिरीश महाजन यांनी केलेले हे विधान चुकीचे आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. असे संजय गायकवाड यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा टोला देखील आमदार गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात