Sanjay gaikwad | Girish Mahajan  Team Lokshahi
राजकारण

भाजपमुळे नाही तर 'या' कारणामुळे शिवसेनेत बंडखोरी, गायकवाडांनी खोडले महाजनांचे वक्तव्य

आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही.

Published by : Sagar Pradhan

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात अद्यापही राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच ही बंडखोरी का झाली कशी झाले? याबाबत आजही वेगवेगळे विधान येत आहे. अशातच या बंडखोरीबाबत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मोठे वक्तव्य केले होते. त्यावरच शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत हे विधान चुकीचे असलेले सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गिरीश महाजन यांनी केलेले हे विधान चुकीचे आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. असे संजय गायकवाड यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा टोला देखील आमदार गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक