Ambadas Danve  Team Lokshahi
राजकारण

सध्याचे सरकार भूखंड लाटणाऱ्यांच्या बाजूचे, दानवेंचा शिंदे- फडणवीस सरकार निशाणा

40 जणांनी गद्दारी केली. शिवसेना संपणार नाही. 140 जागा निवडुन आणण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या मनगटात आहे, असा इशारा दानवे यांनी दिला.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये विविध विषयावरून जोरदार आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यमान सरकार भूखंड लाटणाऱ्यासह गायरान जमिनी हडप करणाऱ्यांच्या बाजूचे आहे. अशी टीका त्यांनी यवतमाळमध्ये बोलत असताना केली.

काय म्हणाले दानवे?

यवतमाळ येथे मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याला जनतेचा पाठींबा मिळत असल्याचे बघून काहींच्या पोटात दुखायला लागले. त्यांनी सल्ले द्यायला सुरुवात केली. येथील काही भामटे त्यावेळी सरकार मध्ये होते. विद्यमान सरकार भूखंड लाटणाऱ्यासह गायरान जमिनी हडप करणाऱ्यांच्या बाजूचे आहे, असा निशाणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी साधला. यवतमाळ येथे आक्रोश मोर्चाला संबोधित करताना मंत्री संजय राठोड यांचे नाव न घेता निवडणुकीत घरी बसवण्याचे आवाहन केले. 40 जणांनी गद्दारी केली. शिवसेना संपणार नाही. 140 जागा निवडुन आणण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या मनगटात आहे, असा इशारा दानवे यांनी दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...