VInayak Raut | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

“फडणवीस हे रंग बदलणारी राजकीय औलाद” विनायक राऊतांची बोचरी टीका

अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी खूप संतापले आहे. ही भाजपाची ही रंग बदलणारी राजकीय औलाद आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात जोरदार राजकीय गदारोळ सुरु असताना, दररोज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवीनवीन विषयावरून खडाजंगी होताना दिसत आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबील थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून हाती घेण्यात आली होती. या मुद्यावरून राज्य सरकारवर विरोधक जोरदार निशाणा साधत आहे. याच विषयावरून आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले राऊत?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, ”महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बील माफ करावे, शेतकऱ्यांकडून बील वसूल करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडून वीजबील वसूल करावेच लागेल, अन्यथा पर्याय नाही, अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी खूप संतापले आहे. ही भाजपाची ही रंग बदलणारी राजकीय औलाद आहे. त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक