राजकारण

Shrikant Shinde: गोऱ्हे, कायंदे, सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते आपल्याला का सोडून जातात ?

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Published by : Siddhi Naringrekar

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की, निवडणुका व्हायच्या तेव्हा त्या होतील मात्र, आपल्याला लोक का सोडून जात आहेत, याचा विचार कधी करणार आहात की नाही. इतकी लोकं सोडून गेली याचे आत्मपरीक्षण करा, नेमकं ते आपल्याला का सोडून जातात ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची मोडतोड केली. त्यानंतर इतके लोक आपल्याला सोडून जातात.

नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मंगेश सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते सोडून जातात याचे आत्मपरीक्षण करणार की नाही. कोणी कुठेही मेळावा घेऊ शकतो. त्याच्याबद्दल मी काय बोलणार ? मेळाव्यामध्ये ते काय बोलले ते मला माहिती नाही. आपला पक्ष वाढवायची मुभा ही सर्वांना आहे. असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून