राजकारण

शरद पवार कृषीमंत्री असताना आंदोलने का झाली नाहीत? सुप्रिया सुळेंच्या मोदी सरकारला कानपिचक्या

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे चांगलेच पडसाद उमटले. राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नव्या कृषी कायद्यांच्या धोरणांना पवार यांचा सुरुवातील पाठिंबा होता, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला कानपिचक्या दिल्या.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांच्या नव्या कृषी कायद्यांबाबतच्या भूमिकेबद्ल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना जोरदार उत्तर दिले. शरद पवार हे 10 वर्षं कृषीमंत्री असताना कोणतेही आंदोलन का झाले नाही? मी इथे शरद पवारांच्यावतीने बोलत नाही. ते आपली भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहेत. मात्र कोणतेही बदल करताना सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांनी चर्चेस सुरुवात केली होती, म्हणून त्यांना विरोध झाला नाही, असे ठामपणे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक