राजकारण

सुप्रिया सुळेंनी हात जोडून केली भाजपाला विनंती म्हणाल्या...

बीडच्या अंबाजोगाईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Published by : Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

बीडच्या अंबाजोगाईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान सुळे यांनी केंद्र सरकारला लक्ष केले आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंडिया आणि भारतच्या नावावरून जनतेवर 14 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या नावामुळे आमचे विरोधक घाबरले असून ते इंडियाचे नाव भारत करू पाहत आहेत. पण आमची भाजपला विनंती असून आम्ही आमचे नाव भारत करतो तुम्ही इंडियाच ठेवा अशी विनंती सुळे यांनी केली. या चौदा हजार कोटीतून सरसकट महाराष्ट्राची कर्जमाफी होईल तर याच पैशातून शाळा हॉस्पिटल होतील. शिवाय महाराष्ट्रात पुरुषांना देखील एसटी मोफत होईल. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी टाकल्या जाणाऱ्या पेंडोलला एक कोटी रुपयांचा खर्च होतो. शासन आपल्या दारी म्हणजे दारात येऊन योजना दिल्या पाहिजेत. कार्यक्रम घेऊन कोटी रुपये खर्च कशासाठी? त्यामुळे या कार्यक्रमाला विरोध असल्याचं सुळे यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chitra Wagh On Pune Crime : राज्यात महिला अत्याचारात वाढ; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष