राजकारण

Telangana Election : तेलंगणाच्या सत्तास्थापनेची धुरा महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्यावर; तातडीने तेलंगणासाठी रवाना

तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं आहे. 2 वेळा संधी दिल्यानंतर तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोल वरून दिसतंय. 119 पैकी 60 जागा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहेत. मात्र एक्झिट पोलनुसार बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्या खात्यात ज्या जागा जातांना दिसतायेत त्यानुसार तेलगंणात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे.

तेलंगणात काँग्रेसचा शंभर टक्के विजय होईल, असे बऱ्याच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसं न झाल्यास महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे एमआयएम. 7 आमदार असलेली एमआयएम यावेळी 9 जागा लढवत आहे. एक्झिट पोलनुसार निकाल लागले तर, कोणत्याचं पक्षाला बहुमत मिळणार नाही अशी परिस्थितीत सत्ता स्थापनेचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षाची मदत घ्यावी लागेल. भाजप किंवा काँग्रेसला एमआयएम साथ देणं अशक्य आहे. बीआरएस आणि एमआयएम यांच्या पडद्यामागून सामंजस्य असल्याचे तेलंगणाच्या राजकारणात बोलले जाते. बीआरएस काठावर पास झाली तरी एमआयएमबरोबर असल्यास सत्ताबदलाच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आणि भाजपचा खेळ बिघडू शकतो.

याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील सत्तास्थापनेची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली