Bhaskar Jadhav Team Lokshahi
राजकारण

'हा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा' भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका

224 जागांसाठी कर्नाटक निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस रिंगणात उतरले होते. या रणसंग्रामात काँग्रेसने गड जिंकत काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे.

Published by : Sagar Pradhan

संपूर्ण देशाचे लक्ष आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आहे. या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकाला नंतर राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. 224 जागांसाठी कर्नाटक निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस रिंगणात उतरले होते. या रणसंग्रामात काँग्रेसने गड जिंकत काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.

नेमकं काय म्हणाले?

कर्नाटकच्या निकालावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आजचा कर्नाटकचा निकाल हा देशाला एक नवी दिशा देणारा आहे. सर्व मतदारांचे अभिनंदन. जिंकून आलेल्या उमेदवारांचंही अभिनंदन. तसेच काँग्रेसचे प्रमुख मलिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांचंही भास्कर जाधव यांनी अभिनंदन केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, भाजप हटाव संविधान बचाव, भाजप हटाव देश बचाव, लोकशाही बचाव, हा निकाल कर्नाटकच्या जनतेने दिला आहे. भाजपला पराभूत करायचं असेल असंच एकजूट होऊन काम करावं लागेल, असेही भास्कर जाधव म्हणाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक