राजकारण

Chandu Mama Vaidya : ठाकरे बंधू एकत्र येणार...? ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया काय?

ठाकरे बंधू एकत्र येणार? चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वळण.

Published by : Prachi Nate

राज ठाकरे यांनी केलेल्या उद्धव ठाकरेंसोबतच्या एकत्र येण्याच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळचं वळण पाहायला मिळत आहे. "मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये मला काही फार कठिण गोष्ट आहे असं वाटत नाही".

राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. तसेच यावर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे."किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

याचपार्श्वभूमीवर ठाकरे बंधू यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. "मी इतकी वर्ष या दोन्ही भावांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न केले आहेत. मराठी माणसाच्या हितासाठी जर कोणी उभ राहणार आहे तर हे दोघे आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठी माणसासाठी कोणी वाली नाही आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्रातील जनतेला खुप अपेक्षा आहेत. त्यामुळे जर हे दोघ एकत्र आले तर त्या अपेक्षा खऱ्या उतरतील. अशी प्रतिक्रिया ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी दिली आहे".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा