Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढलात..उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर घणाघात

उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद विविध कारणाने शिंगेला पोहचला आहे. राज्यात काल सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. यात रत्नागिरी-राजापूर तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाचा सुपडा साफ करण्यात ठाकरे गटाला यश आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले आणि होत आहेत. माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढलात. केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं करण्यात आलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. धनुष्यबाण रामाचे होते, त्याने रावणाला मारण्यात आले. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे. ती पुढे घेऊन जात काम करूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले आहे.

महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा

शिवसैनिकांना बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. लकरच मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून काही दिवसांमध्ये मी बुलढण्यात येणार आणि सभा घेणार असल्याची माहिती देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली. या दौऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यात येईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या