राजकारण

पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका! उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 70 हजार कोटी...

उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रायगड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रायगड : शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीतील सभेतून केला होता. या टीकेला आता उध्दव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होते, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रायगड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उध्दव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होतं. ते म्हणाले की शरद पवार यांनी शेतीसाठी काही केलं नाही. परंतु, 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शरद पवारांनीच केली होती. किती सुडाचं राजकारण कराल, असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

महाराष्ट्रातील बडे नेते केंद्रात बराच काळ कृषीमंत्री होते, वैयक्तिकरित्या सन्मान करतो. मात्र, माजी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल विचारत पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा