राजकारण

पुनर्वसन होईपर्यंत तुमच्यासोबत राहू; उद्धव ठाकरेंनी दिला दुर्घटनाग्रस्तांना दिलासा

रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली.

Published by : Siddhi Naringrekar

रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे.पाऊस, सर्वत्र झालेला चिखल व तसेच मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शोधकार्यात अनेक अडचणी येत आहेत. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत दिली. बचाव कार्यात 98 व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावात उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे. इर्शाळगड दुर्घटनेतील पीडितांशी ते संवाद साधत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारण्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत. तुम्हाला पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेऊ.

तसेच मी तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू.दरवेळी अशा दुर्घटना घडत असतात. आपण फक्त धावतो. मी यात राजकारण करत नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरेंसोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद