राजकारण

Nana Patole : भाजपवर आम्ही लक्ष ठेवून आहोत

Vidhan Parishad Election : नाना पटोले यांनी केली भाजपवर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) अवघे दोनच दिवस राहिले आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) खास काळजी घेण्यात येत असून प्रमुख पक्षांच्या बैठका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रणनीती तयार झाली आहे. महाविकास आघाडी 6 जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, रणनीती तयार झाली आहे. आमचे अपक्ष आणि सहकारी सदस्य एकत्र आले आहेत. 20 तारखेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी 6 जागा जिंकेल.

तर भाजपवर टीका करताना ते म्हणाले, आता विरोधकांचे अंतर जास्त आहे. त्यांना गणित कठीण जाईल. यामुळे भाजपची विकेट पडेल. महाविकास आघाडी जवळ अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे आम्हाला भीती नाही. तर, भाजप कुणासोबत बोलतात, काय करतात यावर देखील आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही पटोले यांनी सांगितले आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आमदारांना फोन करत आहेत योग्य वेळी आम्ही हे दाखवू. तसेच, त्यांच्या दबावाला आम्ही घाबरत नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट