राजकारण

दादांचं मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल; वडेट्टीवारांच्या विधानाची चर्चा

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्या विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दादांचं मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी म्हंटले आहे. या विधानावरुन महाविकास आघाडीत आले तर दादा मुख्यमंत्री होतील, असे संकेत वडेट्टीवारांनी दिल्याची चर्चा होत आहे.

ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल आहे. ८० टक्के ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तर, प्रत्येक आईची इच्छा असेलंच. आईचे स्वप्न असतातंच. मात्र, ते स्वप्न पूर्ण कशे होणार आणि पूर्ण कोण करणार? असं दूर दूर दिसत नाही. अजित दादा यांच्या आईचे स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही. राज्यात सत्तापरिवर्तन होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दादांचा मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल, असेही वडेट्टीवारांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचे मतदारसंघात दुष्काळ जाहिर केला आहे. तोंड पाहून दुष्काळ जाहिर केला आहे. कापसाला आणि सोयाबीनला दर का मिळत नाही? सोयाबीनचं निम्म पिक हातचं गेलंय. पश्चिम महाराष्ट्राच्या वातावरणात सुट होणारं बियाणं विदर्भात दिलं. सोयाबीनचा २ हजार रुपये क्विंटल, आणि कापसाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल बोनस जाहिर करावा नाहीतर शेतकरी आत्महत्या वाढणार, अशी भीती त्यांनी वर्तवली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड