राजकारण

हे अपघात सरकारच्या घाईमुळेच; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरुन विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. यावर राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

समृद्धीचा काम अर्धवट असतांना एंड टू एंड सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. त्या मार्गावर रेस्ट रूम नाही. समृद्धीत भ्रष्टाचाराचं झाला हे कोणी नाकारू शकत नाही. घाई गडबडीत काम करण्यात आले. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी आज जात आहे. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहे. यात तांत्रिक अडचणी आहे. समृद्धीची वाहतूक थांबवावी का समृद्धी सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे, असे विजय वडेट्टीवारांनी म्हंटले आहे.

तर, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर ते म्हणाले की, मागणी केली की असं आरक्षण जाहीर करता येत नाही, सरकारने वेळ देऊन फसवणूक का केली, सरकार खेळवत ठेवण्याचे काम करत आहे. उद्या नागपुरात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनेची रविभवन नेते अकरा वाजता बैठक होणार आहे. यात 40 संघटना असणार आहे. 10 दिवसात आरक्षण देता येते का? पुन्हा तोंडाला पान पुसली जाते का? ही जबाबदारी सरकारची आहे. मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये, असा पुनरुच्चार वडेट्टीवारांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...