महाराष्ट्र

Mahad Flood | आदिवासी वस्तीतील संसार रस्त्यावर

Published by : Lokshahi News

मागील आठवड्यात आलेल्या महापूराने हजारो संसार उध्वस्त केले. महाड तालुक्‍यात तर हाहाकार उडाला. याच तालुक्‍यातील काळीजकोंड आदिवासी वस्तीतील बावीस घरे अक्षरशः जमीनदोस्त झाली. आज ही मोडलेली घरे आणि वाहून गेलेला संसार पाहत बसण्यापलीकडे काहीच उरलेले नाही.

अन्नधान्य आणि कपड्यांची तात्पुरती मदत पोहचते. पण शिजवायचे कशावर आणि झोपायचे कुठे या समस्या आहेतच. नदी काठावर वसलेली ही वस्ती कधी ना कधी पुराचा फटका बसणारच होता म्हणूनच गेली तीन वर्षांपासून ही माणसे प्रशासनाकडे सुरक्षित जागेची मागणी करत होते.

मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि आज अखेर ही बावीस घरं जमीनदोस्त झाली. आता तरी डोळे उघडा आणि आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी हे लोक करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा