Maharashtra Assembly Monsoon Session 
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरणार?

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून शेवटच्या आठवड्यातही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

आज विधानसभेत ठाण्यातील माजीवडे येथील कांदळवण नष्ट करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. मात्र याकडे अद्याप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच विधान परिषदेत मुंबईतील स्वच्छतागृह, कबूतर खाणे बंद केल्यानंतरची परिस्थिती आणि कामगार मंडळातील अनियमितता यावर विरोधक सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे.

यासोबतच संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरूनही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार असून शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा